संस्थेचा प्रथम वर्धापन दिवस नाशिक येथे दि १९ मार्च २०२२ रोजी साजरा करण्यात आला. सात कुटुंबातील १३ व्यक्तीनी एकमेकांचे ओळख करून घेतली. त्या सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला, पुण्यातील श्री श्रीकांत गोपाळ यांनी गुगल मिट च्या माध्यमातून सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या उद्देशांची, कामाची व विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर श्री श्रीनिवास गजानन यांनी सर्वांशी संवाद साधला व सर्वप्रथम संस्थेचे सभासद होण्यासाठी आग्रह केला. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

