आपली दैवतं


गुहागरचा व्याडेश्वर – श्री विष्णूचा सहावा अवतार असलेले भगवान परशुराम हे शंकराचे एकनिष्ठ उपासक होते. त्यांनी पश्चिम सागर हटवून कोकणभूमी निर्माण केली. भगवान परशुराम दररोज समुद्र स्नानासाठी महेंद्र पर्वतावरून गुहाग्राम या परिसरात येत असत. त्यांच्या उपासनेवर संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी परशुरामांच्या इच्छेनुसार गुहाग्राम येथे गुप्त स्वरूपात वास्तव्य ठेवण्याचे कबूल केले.

श्री विष्णूचा सहावा अवतार असलेले भगवान परशुराम हे शंकराचे एकनिष्ठ उपासक होते. त्यांनी पश्चिम सागर हटवून कोकणभूमी निर्माण केली. भगवान परशुराम दररोज समुद्र स्नानासाठी महेंद्र पर्वतावरून गुहाग्राम या परिसरात येत असत. त्यांच्या उपासनेवर संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी परशुरामांच्या इच्छेनुसार गुहाग्राम येथे गुप्त स्वरूपात वास्तव्य ठेवण्याचे कबूल केले.

भगवान परशुरामांनी अगस्ती, बोधायन, सत्याषाढ, बाण्कल, दालभ्य, व्याडी, इत्यादी अनेक ऋषींना कोकणप्रांतात येऊन आश्रम स्थापण्याची विनंती केली. त्यांच्यापैकी ‘व्याडी’ नावाच्या ऋषींनी, भगवान परशुरामांच्या संमतीने सागरतीरावर आश्रम स्थापन केला व तेथे शिवाच्या उपासनेसाठी एका शिवलिंगाची स्थापना केली. कालांतराने हे व्याड ऋषींनी स्थापन केलेले शिवलींग बांबूच्या बेटात वेढले गेले.

हे शिवलिंग अधशाळेजवळ (वाडासान्निध) प्रकट झाले म्हणून त्याचे नांव व्याडेश्वर पडले असावे. एक वदंता अशी आहे की, भगवान शंकराने या भागात गुप्तरीतीने वास्तव्यास संमती दिली, म्हणून गुप्तघर किंवा गुह म्हणजे कार्तीकेय याचे स्थान म्हणून ‘गुहाघर’ असे नामकरण झाले असावे.

स्वयंभू व्याडेश्वराचे मंदिर अतिप्राचीन असून ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजवीकडे गरुड व डावीकडे हनुमान यांची मंदिरे आहेत. नंतर देवालयाचा मुख्य सभामंडप आहे. तेथे शिवाच्या पिंडी समोर स्थापन केलेला एक भव्य काळ्या पाषाणातील नंदी आहे. मुख्य सभामंडप आणि गाभारा यामध्ये एक होम हवन करण्यासाठी सभामंडप सुमारे ३० फूट x ३० फूट आकाराचा असून येथे कासवाची प्रतीमा आहे. गाभाऱ्यात मध्यभागी भंगलेले असे (कपचा उडालेले) शिवलिंग आहे. जेव्हा त्या शिवलिंगावर गुराख्याने प्रहार केला तेव्हा त्याच्या उडालेल्या रक्त असलेल्या कपच्या यांची लोकांनी असगोली, बोर्‍या अडूर व अंजनवेल येथे स्थापना करुन याच व्याडेश्वराचा अंश असलेली अशी वेगळी देवळे स्थापन केली.

व्याडेश्वराचे मंदिर पूर्ण काळ्या पाषाणाचे असून हे पूर्ण पंचायतन आहे. आग्नेय दिशेला गणपतीचे, नैऋत्य दिशेला दुर्गामातेचे, वायव्य दिशेला लक्ष्मी-नारायणाचे व ईशान्य दिशेला सूर्यनारायणाचे मंदिर आहे. मंदिरात पूर्व दिशेला दोन भव्य दीपमाळा असून जवळच एक मोठी विहीर आहे. देव दर्शना अगोदर हात-पाय धुण्याची, नळावाटे पाण्याची सोय केली आहे. मंदिर दिवसभर भक्तांच्या दर्शनासाठी उघडे असते. या मंदिराचा पेशवे काळात जीर्णोद्धार झाला होता. तद्नंतर १९६६-६७ मध्ये पुन: जीर्णोद्धार केला गेला. १९९२ साली हे मंदिर तैलरंगाने रंगविण्यात आले.

श्री व्याडेश्वराची दररोज षोडषोपचार पूजा, अभिषेक, महानैवेद्य, आरती इत्यादी विधी होतात. संध्याकाळी सायंपूजा देखील सुरु केली आहे. श्रावण व कार्तिक महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्त येथे मोठ्या संख्येने येतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी, आषाढी व कार्तिकी एकादशीला व महत्त्वाच्या प्रत्येक सणाचे दिवशी व्याडेश्वराचा चांदीचा मुखवटा दर्शनासाठी मंदिरातल्या सभागृहात ठेवला जातो. कार्तिक महिन्यातील त्रिपुरी पौर्णिमा व माघ महिन्यातील महाशिवरात्र हे दोन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवात गोवा प्रांतातील अनेक भक्तगण दर्शनास येतात. या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो.

येथे भक्तासाठी राहण्याची, भक्त निवासात सोय केली असून देवळाच्या आसपास जेवणाची भरपूर सोय आहे.

सोमेश्वरचा सोमेश्वर – रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर गावी ‘सोमेश्वर’ हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तो अनेक चित्पावन ब्राह्मणांचा कुलस्वामी आहे. हिंदळे या गावी असलेले हे देवस्थान परकीय आक्रमणामुळे सुमारे ५०० वर्षांपूर्वी सध्याच्या ठिकाणी ज्या गावाचे नाव ‘सोले/सोलिये’ असे होते, या ठिकाणी आणण्यात आले. कालांतराने या गावाचे नाव सोमेश्वर असे झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर गावी ‘सोमेश्वर’ हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तो अनेक चित्पावन ब्राह्मणांचा कुलस्वामी आहे. हिंदळे या गावी असलेले हे देवस्थान परकीय आक्रमणामुळे सुमारे ५०० वर्षांपूर्वी सध्याच्या ठिकाणी ज्या गावाचे नाव ‘सोले/सोलिये’ असे होते, या ठिकाणी आणण्यात आले. कालांतराने या गावाचे नाव सोमेश्वर असे झाले.

समुद्रसपाटीपासून सुमारे २० फूट उंचीवर काजळी नदी खाडी लगत वसलेल्या या गावाच्या साधारणपणे मध्यावर हे पश्चिमाभिमुख असे मंदिर आहे. मंदिराचा गाभारा ६ ते ७ फूट लांब-रुंद आणि सुमारे १ फूट खोल असून साधारणपणे त्याच्या मध्यभागी मुख्य देव सोमेश्वर याची शाळुंका आणि तिथेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांची तीन अंगुष्ठमात्र लिंगे आहेत. देवळाच्या रचनेमध्ये लाकूडकाम बऱ्याच प्रमाणात वापरले आहे. 

वैशाख महिन्यांतील तीन दिवस मावळत्या सूर्याची किरणे या शाळुंकेवर पडतात. पश्चिमेकडील सोप्यात मध्यभागी नंदी व कासव यांची शिल्पे आहेत. आग्नेय कोपऱ्यात पार्वतीची मूर्ती आहे. श्री सोमेश्वराच्या घुमटीच्या उत्तरेला श्री भोलेश्वर मल्लिकार्जुन आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात स्वतंत्रपणे श्री गणपती व काळभैरव यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात तीन छोटी मंदिरे असून त्यात रवळनाथ, विठ्ठलादेवी व काळभैरव यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात तीन नंदादीप पैकी एक सरकारी आहेत. काही वर्षांपूर्वी गोव्यातील केळकर मंडळींनी गाभाऱ्याचे सुशोभीकरण केले आहे. १९५७ मध्ये रजिस्टर्ड संस्था स्थापन करुन महाशिवरात्र, गोकुळअष्टमी, दासनवमी, त्रिपुरा पौर्णिमा, माही चतुर्थी वगैरे उत्सव यथासांग साजरे केले जातात. 

श्री सोमेश्वर मंदिराखेरीज श्रीरवळनाथ, वरद विनायक, ग्रामपालेश्वर यांची आणि शेजारील उंच डोंगरावर ‘भारडीण देवीचे’ मंदिर आहे. सोमेश्वर गावाच्या तीन बाजूने म्हणजे पूर्व-पश्चिम-उत्तर अशा दिशांनी काजळी नदी व खाडीने वेढले आहे. त्यामुळे तीन बाजुने पाणी (पश्चिमेला अर्थात समुद्र) आणि काठावर नारळी-पोफळी-फणस यांच्या बागा हे दृश्य मोठे विलोभनीय दिसते. श्री सामेश्वर मंदिराभोवती पूर्व-पश्चिम १०० फूट लांब, ९० फूट रुंद असा ६ ते ७ फूट उंचीचा कोट आहे. देवालयासमोर सहा दीपमाळा (त्रिपुर) आहेत. त्या आठवले, दामले, सोवनी, गोखले, केळकर व फडके यांनी बांधल्या आहेत.

पूर्वी सोमेश्वर गावात ५० चौसोपी वाडे होते. या गावात सोवनी, लिमये, गोखले, आठवले, केळकर, जोशी, फडके, भिडे, गोडबोले, फाटक, देवल, करमकर इत्यादी चित्पावनांची कुटुंबे पूर्वी राहत होती. काही पिढ्यांपूर्वी नोकरी, व्यवसाय, शिक्षण इत्यादी कारणपरत्वे ही मंडळी परगावी गेली व आता मुस्लिम वसती मात्र झपाट्याने वाढत आहे. गावात वीज, फोन, पोस्ट, शाळा, व्यवस्थित रस्ता आदि सोयी झाल्या आहेत. पूर्वी हे मसाल्याचे पदार्थांचे सुंदर बेट होते.

सोमेश्वर गाव रत्नागिरी पासून ६ ते ७ किलो मीटर अंतरावर आहे. तसेच जवळच टेब्यें, नाचणे, पोमेंडी ही गावे पण आहेत.

आंबेजोगाईची योगेश्वरी – फार फार वर्षापूर्वी दंतासूर नावाचा एक राक्षस जयंती नगरीवर राज्य करीत होता. त्याच्या राजधानीचे ठिकाण जयंतीनगरी पासून १६-१७ किलोमिटरवर असणार्‍या बर्दापूर या गावी होते. तो महादेवाचा निस्सीम भक्त होता व त्याच्या कृपाप्रसादाने उन्मत्त झाला होता. तो ऋषी मुनींच्या होम हवन इत्यादी कार्यात अडथळे आणून त्यांचे हाल करीत असे. याच्यावर उपाय शोधण्यासाठी सर्व देव एकत्र बसले व त्यांनी आदी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावर ती प्रसन्न होऊन तिने जयंती नगरीत दंतासूराचे पारिपत्य करण्यासाठी अवतार घेईल असे सर्व देवांना आश्वासन दिले. त्याप्रमाणे पुढे मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमेस आदीमाया योगेश्वरीने जयंती नगरीत अवतार धारण केला. नंतर तिने दंतासूराचा वध केला.

फार फार वर्षापूर्वी दंतासूर नावाचा एक राक्षस जयंती नगरीवर राज्य करीत होता. त्याच्या राजधानीचे ठिकाण जयंतीनगरी पासून १६-१७ किलोमिटरवर असणार्‍या बर्दापूर या गावी होते. तो महादेवाचा निस्सीम भक्त होता व त्याच्या कृपाप्रसादाने उन्मत्त झाला होता. तो ऋषी मुनींच्या होम हवन इत्यादी कार्यात अडथळे आणून त्यांचे हाल करीत असे. याच्यावर उपाय शोधण्यासाठी सर्व देव एकत्र बसले व त्यांनी आदी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावर ती प्रसन्न होऊन तिने जयंती नगरीत दंतासूराचे पारिपत्य करण्यासाठी अवतार घेईल असे सर्व देवांना आश्वासन दिले. त्याप्रमाणे पुढे मार्गशीर्ष शुध्द पौर्णिमेस आदीमाया योगेश्वरीने जयंती नगरीत अवतार धारण केला. नंतर तिने दंतासूराचा वध केला.

श्री. जोगळेकर यांनी आपल्या ‘सह्याद्री’ नामक ग्रंथात कोकणसंस्थांच्या या कुलदेवतेविषयी काही अनुमान काढले आहे. कोकण प्रांती समुद्र किनाऱ्याजवळ भगवान परशूराम वास्तव्य करीत असताना त्यांना एके दिवशी चौदा प्रेते समुद्रातून वाहून आलेली दिसली. भगवान परशूरामांनी त्यांना मंत्रोपचाराने सजीव केले. या सर्वांना चितेपासून संरक्षण देऊन सजीव केल्यामुळे ते चित्पावन असे गणण्यात येऊ लागले. त्यांना स्थानिक रहिवासी लग्नासाठी वधू देण्यास नाकारत होते. तेव्हा भगवान परशूरामांनी अंबापूर येथून काही मुली वधू म्हणून आणूून त्यांची लग्ने लाविली. त्या मुलींची देवी आंब्याची जोगाई ही होती. त्यामुळेच कोकणस्थांची ही देवी कुलदेवता मानण्यात आली. या देवळाचा जिर्णोद्धार शके ११५० मध्ये खोलेश्वर याने केल्याची नोंद एका शिलालेखात आहे. आंबे जोगाई शहराच्या मधोमध वाहणार्‍या जयंती नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीचे मंदिर पुराण काळापासून अस्तित्वात आले आहे.

मंदिराची रचना हेमाडपंती स्वरुपाची आहे. मुख्य मंदिर उत्तराभिमूख आहे. मंदिरात दर्शनास जाताना दक्षिणाभिमूख असलेल्या महाद्वारातून जावे लागते. महाद्वावर नगारखान्याची व्यवय्था केलेली आहे. या महाद्वारासमोर १०० फूटावर पूर्वोभिमूख असलेल्या व उत्तराभिमूख असलेल्या महाद्वारासमोर दोन दीपमाळा आहेत. विशेष उत्सवप्रसंगी दीपमाळेवर दिव्यांची आरास करण्यात येते. पूर्वाभिमूख असलेल्या महाद्वारातून आंत प्रवेश करताच उंचच उंच असलेले एक वैभवशाली शिखर व इतर लहान लहान अशी चार शिखरे व हेमाडपंती बांधकाम असलेले मंदिर दृष्टीस पडते. मुख्य मंदिरास पूर्व-पश्चिम व उत्तर बाजूने दरवाजे आहेत. मंदिराच्या मुख्य सभागृहात प्रवेश करताच मंदिराच्या भव्य बांधकामाची प्रचिती येते. मंदिराच्या मूख्य सभागारात प्रवेश करताच मंदिराच्या भव्य बांधकामाची प्रचीती येते. मंदिराच्या छताच्या बांधणीमध्ये दगडी चिरे रचण्याची पध्दती त्यात साधलेली निरनिराळी कोन पध्दती मुख्यत: सुंदर व विविध स्वरूपाचे कोरीव काम यामुळे देवळाला भक्कमपणा बरोबरच आकर्षकताही आली आहे. मोठमोठ्या दगडी खांबावर आणि गर्भाभाराचे चौकटीवर कोरलेले बारीक कोरीव काम प्रमाणबध्द व लाघवपूर्ण असून त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढते.

देवीचे दर्शन घेऊन उजवीकडे वळताच महाकाली व महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी ह्यांच्या मूर्तींचे दर्शन घडते. सभामंडपातील गणपती, केशवराज व देवीची भोगमूर्ती इत्यादींना वंदन करून मंदिराच्या उत्तर द्वाराने बाहेर पडताच समोर एक होमकुंड दृष्टीस पडते. उत्सव प्रसंगी तेथे शतचंडी हवन होत असते. होमकुंडावर मुख्य मंदिरासमोर मजबूत बांधणीचा भव्य सभामंडप बांधलेला आहे. सभामंडपात नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर दंतासूर वधाच्या जागेची आठवण करून देणारी दंतासुराची प्रतिमा दृष्टीस पडते. मंदिरालगतच्या आतील पराकोटास पूर्व, पश्चिम व उत्तर या तीनही बाजूंना दरवाजे आहेत. नगारखान्यावर दररोज तिन्ही त्रिकाळ सनई व चौघड्याचे वादन होते. नैर्ऋत्य बाजूच्या ओवरीत रेणूका मातेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. एक ओवरी “मीराची ओवरी” ह्या नावाने ओळखली जाते. ‘हरीवरदा’ ह्या ग्रंथाची निर्मिती करताना कृष्ण दया वर्णवांनी ह्याच ओवरीवर वास्तव्य केले होते. दक्षिण बाजूच्या ओवर्यांना लागून राजे दिनकरराव ह्यांचा राजवाडा आहे. देवीच्या त्रिकाळ पुजेची व नैवेद्याची व्यवस्था ठेवणाऱ्या ब्राह्मण पुरोहितांच्या निवासासाठी त्याचा उपयोग होतो. उत्तर बाजूच्या ओवर्यांना टेकून एक प्रशस्त पाकगृह बांधण्यात आले आहे.

मंदिरासमोरच्या उत्तराभिमूख महाद्वाराने बाहेर पडताच समोर दिसणाऱ्या दिपमाळेच्या पलीकडे ‘सर्वेश्वर तिर्थ’ अथवा ‘सर्व तिर्थ’ दृष्टीस पडते. हे देवीच्या स्नानाचे तीर्थ आहे. ह्या तिर्थावर पश्चिम बाजूस सर्वेश्वर, रूद्रभैरव व महारूद्र ह्यांची मंदिरे आणि दिपमाळेजवळ सत्पुरुषांच्या चार समाधी शिळा आहेत. शिखर असलेल्या मंदिरात संन्यासी गोडसेबुवा, त्यांच्या पश्चिमेस साध छत असलेल्या इमारतीत श्री लेले महाराज व आबाबुवा आणि त्यांच्या उत्तरेस डुबरगे महाराज यांच्या समाध्या आहेत. देवालयाच्या आग्नेय बाजूस एक धर्मशाळा श्री. तात्या चवसाळकर ह्यांनी बांधली आहे. तिचा भक्तगणांना राहण्यासाठी उपयोग होतो.

तटबंदीच्या पश्चिम द्वारातून बाहेर पडले असता जवळच ‘माया मोचन तीर्थ’ दृष्टीस पडते. तीर्थाच्या जवळ काळभैरव, अग्निभैरव, महारुद्र, गणेश आणि नारदेश्वर यांची लहान लहान मंदिरे आहेत. रोज पहाटे पाच वाजल्यापासून देवीच्या नित्योपासनेला सुरवात होते. प्रथम गुरव पुजाऱ्याकडून देवीची प्रात:पूजा होते. राजे दिनकरराव राजवाडे ह्यांनी देवीच्या त्रिकाळ पूजेची नैवेद्याची शुक्रवार व पौर्णिमेच्या छबीन्याची व रोज नंदादीपांची व्यवस्था करून ठेवली आहे. श्रीमंत पेशव्यांनी दुपारी देवीला नैवेद्य अर्पण करण्यासाठी श्री. दामोदर यांचे मार्फत व्यवस्था करून ठेवली आहे. देवीला तांबुल अर्पण करण्यासाठी सरकारी खजिन्यातून रोख रक्कम मिळत असते.

नैमित्तीक आराधना – दर मंगळवारी व शुक्रवारी नगारखान्यात दिवसातून ५ वेळा चौघडा व सनईचे वादन होते. शुक्रवारी देवीच्या भोगमूर्तीचा छबीना गरुड अथवा सिंह ह्या वाहनावरून मंदिराच्या परिसरात निघत असतो. छबिन्याच्या वेळी पोत व परडीधारी अराधीनी व इतर भक्तगण योगेश्वरीचा ‘उदयोस्तु’ असा घोष करीत असतात पौर्णिमेच्या दिवशी ह्या सोहळ्यास बरेच भक्तगण उपस्थित असतात. देवीची अलंकार पूजा, गुढीपाडवा, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांच्या दिवशी व अश्विन व मार्गशिर्ष महिन्याच्या उत्सव काळात होते.

योगेश्वरी देवीचे वार्षिक उत्सव – एक अश्विन महिन्यात व दुसरा मार्गशिर्ष महिन्यात साजरा केला जातो. अश्विन मासी शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास आरंभ होते. शुद्ध पंचमीपासून विजयादशमी पर्यंत दररोज अलंकार पूजा होते. अष्टमी व नवमी तिथीच्या संधीकालावर शतचंडी हवनाची पूर्णाहुती होते. नवमीच्या दिवशी देवीला महाभोगी केली जाते. शेकडो स्त्रिया त्या दिवशी मंदिरात भोगी अर्पण करण्यासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी समारंभपूर्वक देवीची पालखी निघते. पालखीची मिरवणूक, रविवारपेठ परळी वेस मार्गाने महाविद्यालय रस्त्याला मिळते व नंतर प्रशांतनगर, नवी वसाहत आणि गुरुवार पेठेतून मंदिरात परत येते.

मार्गशिर्ष महिन्यात शुद्ध सप्तमीपासून घटस्थापना होऊन उत्सवास सुरवात होते. दररोज रात्री वाघ्या, मुरळी, गोंधळी ह्यांची हजेरी व गायनाचे कार्यक्रम होतात. एकादशीपासून अलंकार पूजा होते. पौर्णिमेच्या दिवशी शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती होते. मार्गशिर्ष पौर्णिमा हा देवीचा अवतार दिवस आहे. रात्री पालखीतून योगेश्वरीची गावभर मिरवणूक काढली जाते. या दिवशी येथे खूप मोठी यात्रा भरते.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराजवळ घोडदरीत जयंती नदीचे पश्चिम काठावर योगेश्वरी/जोगाईचे मंदिर हे तीर्थस्थान आहे.