नारायण महादेव उर्फ नानासाहेब आठवले


उद्योगपती (श्रीमती पार्वतीबाई यांचे पुत्र)
कोकणामधला रत्नागिरी जिल्हा हा त्या मातीतून निर्माण झालेल्या महामानवांसाठी प्रसिद्धच आहे. याच जिल्ह्यात असलेल्या देवरुख या तालुक्याच्या गावी नानासाहेबांचा जन्म 15 डिसेंबर 1890 नव्वद रोजी झाला. अतिशय सामान्य परिस्थितीतील आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या या मुलाचे दुर्दैव बहुधा पाचवीलाच पुजलेले होते. दीड वर्षाच्या वयातच पितृछत्र हरवल्याने, आईबरोबर या मुलाला आपल्या आजोळी आधार घ्यावा लागला होता. आजोळी सुद्धा परिस्थिती काही फारशी चांगली होती असे म्हणता येणार नाही. छोट्याश्या शेत जमिनीवर कुटुंबाची कशी बशी गुजराण होत होती. छोट्या नानाचे भविष्य पूर्णपणे अंधकारमयच होते असे म्हटले तरी फारसे वावगे ठरू नये.

नानाच्या आईबरोबर त्याची मावशी बाया ही सुद्धा अगदी लहान वयातच विधवा होऊन माहेरी परतली होती. तिचे आई वडील व थोरले बंधू यांनी दाखविलेल्या असामान्य दूरदृष्टीमुळे तिचा पुनर्विवाह, महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्याशी याच सुमारास झाला. ही घटना छोट्या नानाच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारी ठरली. बाया मावशी व अण्णा यांनी नानाची पूर्ण जबाबदारी घेतली व कोकणातील भविष्यविरहित परिस्थितीतून नाना पुण्याला शिक्षणासाठी आला.

अण्णा व बायाचे ऋण नानासाहेबांनी पूर्णपणे फेडले. शाळा कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या आवडीच्या भौतिकी (झकधडखउड) या विषयात त्यांनी पदवीत्युत्तर शिक्षण घेतले व एम. एससी. पदवी प्राप्त करून घेतली. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर, सहजा सहजी मिळू शकणारी सरकारी नोकरी व मानमरातब याचा मोह सोडून देऊन त्यांनी आपल्या आयुष्याची उमेदीची पंचवीस वर्षे, अण्णांच्या संस्थेत (हिंगणे स्त्री शिक्षण संस्था), संस्थेला शक्य असेल तेवढेच वेतन घेऊन, संस्थेच्या कार्यास हातभार लावण्यात घालवली. संस्थेने स्थापन केलेल्या महिला विद्यापीठात (सध्याचे एस. एन. डी. टी. विद्यापीठ) त्यांनी रजिस्ट्रार, प्राध्यापक व प्रिन्सिपॉल ही पदे सांभाळली. निवृत्त झाल्यावर नानासाहेब स्वस्थ बसले नाहीत. आपल्या आवडीच्या शास्त्रीय व विद्युत उपकरण निर्मितीच्या धंद्यात त्यांनी लक्ष घातले. कॉलेजांना लागणार्‍या शास्त्रीय उपकरणांच्या उत्पादनाला त्यांनी प्रथम सुरुवात केली. नंतर विद्युत व प्रकाशीय उपकरणांचेही उत्पादन त्यांनी सुरु केले. दुसर्‍या महायुद्धात भारतीय आरमारासाठी त्यांनी संपूर्ण स्वदेशी बनावटीचे, अल्डिस सिग्नलिंग दिवे, विकसित केले व आरमाराला पुरवले. धंदा आपल्या कुवतीप्रमाणे एका विवक्षित मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे वाढविला व पुढे आपली मर्यादा लक्षात घेऊन तो धंदा वाढावा या साठी तो विकण्याचा धाडसी निर्णयही घेतला. एक कल्पना मनात घेऊन त्यावर, (ज्याला अलीकडे ’डींरीीं णि’ असे म्हणतात), धंदा उभा करायचा व पुढे योग्य किंमत मिळाल्यास तो विकून टाकायचा ही नवीन युगातील एक संकल्पना आहे. इंटरनेटवरून मेल पाठविण्यासाठी जन्माला आलेली ‘केीांरळश्र’ ही या संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे. परंतु नानासाहेबांनी साठ वर्षापूर्वीच ही कल्पना राबविली व उपकरण निर्मितीचा धंदा आणि आपली परिस्थिती दोन्ही सुधारली. सांपत्तिक परिस्थिती सुखकर झाल्यावर अण्णांचे उरले सुरले ऋण फेडण्यासाठी नानासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या कमाईचा एक फार मोठा हिस्सा अण्णांच्या संस्थेला देणगी म्हणून दिला.

शास्त्रीय व विद्युत उपकरणांच्या भारतीय उत्पादकांच्या समित्यांवर तसेच भारत सरकारने नेमलेल्या या विषयांवरच्या अनेक समित्यांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. या विषयातले एक प्रमुख तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे ते बरीच वर्षे उपाध्यक्ष होते.

नानासाहेबांच्या आयुष्याची जडण घडण करण्यात त्यांची आई, श्री. पार्वतीबाई आठवले यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या आयुष्याची कहाणी पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून एक वेब साईट ही उपलब्ध आहे. ज्या वाचकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे अशा वाचकांनी पुढील वेबसाईटवर  पार्वतीबाईंची कहाणी पाहावी -  ुुु.रींहर्रींरश्रश.पशींषळीाी.लेा हातात भरपूर पैसे खेळू लागल्यावरही नानासाहेबांनी त्या पैशांवर कधी चैन, मौज मजा केली नाही. परंतु आपल्या ’ईीीेंपेाू’ या छंदावर पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्यास मात्र त्यांनी कधी मागे पुढे पाहिले नाही. आपल्या राहत्या घरावर तिसरा मजला बांधून त्यात त्यांनी स्वत: बनविलेली एक टेलिस्कोप बसवून घेतली व वयपरत्वे तिचा वापर आपल्याला करता येणार नाही हे लक्षात आल्यावर ती टेलिस्कोप त्यांनी फर्ग्युसन कॉलेजला देणगी म्हणून दिली. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते मनाने व शरीराने कार्यरत होते. निरनिराळे नव नवीन प्रयोग करणे, वाचन करणे हे त्यांनी कधी सोडले नाही.