२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नागाव आणि अलिबाग येथील आठवले कुटुंबातील सदस्य तसंच चित्पावन आठवले फाऊंडेशनचे पुण्यातील संचालक श्री विनायक विष्णू यांनी नागाव खालची आळी इथल्या गणपती मंदिर सभा मंडपात संवाद साधला. आठवले फाउंडेशनतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी सर्वाना माहिती दिली. यावेळी नागवकरांच्या वतीने श्री रमेश प्रभाकर यांच्या हस्ते श्री विनायक यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच नुकतीच सीए ची उत्तीर्ण झालेल्या कु मृण्मयी किशोर हिचा सत्कार श्री विनायक यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व उपस्थित आठवले यांनी आपल्या फौंडेशनच्या कामाबद्दल आणि एकंदर कार्यशैलीबद्दल खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. फौंडेशनच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवला जाईल याची सर्वानी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला श्री रमेश प्रभाकर, श्री श्रीविजय श्रीपाद, श्री विजय काशिनाथ, श्री श्रीकांत जयंत, श्री संतोष राम, डॉ मकरंद अरविंद, श्री संदेश शशिकांत, श्री पुष्कर प्रसाद, श्री किशोर परशुराम, श्री उदय जनार्दन, श्री अभय जनार्दन, श्री राजाराम विष्णू, श्री अनिरुद्ध विष्णू, श्री रोहन श्रीकांत, श्री अनिकेत सुहास, श्री मिलिंद चंद्रकांत, श्री अजित श्रीपाद, श्री प्रदीप राजाराम, डॉ. निशिगंध अरविंद, श्री विनायक विष्णू आणि महिला वर्गात भाग्यश्री प्रसाद, मृणाल अजित, शिल्पा मंगेश, प्रीती प्रदीप, मृण्मयी किशोर, अलका श्रीविजय, , स्नेहा किशोर आदी उपस्थित होते.



