कुलसम्मेलन – मार्च २०२०


चित्पावन आठवले कुळाचे कुलसंमेलन 1 मार्च ला पुणे येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर येथे संपन्न झाले. महाराष्ट्र चित्पावन संघाचे श्री. जयंत नातू, श्री. अशोक वझे, तसेच श्री. अनिल गानू हे खास निमंत्रित म्हणुन हजर होते। सकाळ 8 वाजता सभासदचे नाव नोंदणीस आरंभ झाला व 280 जणांनी नाव नोंदणी केली. इतका अभूतपूर्व प्रतिसाद खचीतच एखादया कुलसंमेलनास मीळाला असेल. बरोबर 10.15 ला सौ. शैलाताई मुकुंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून मंच सभाळला. जेष्ठ सदस्य श्री. माधवराव आठवले व सौ., सुमातीबाई यांचे हस्ते परशुराम पूजनाने संमेलनाची सुवात झाली. यानंतर खास निमंत्रित व श्री. विजय मुकुंद, श्री. मिलींद पुरुषोत्तम, श्री. अनिल महादेव, श्री.सतीश गजानन व श्री. विनायक विष्णू यांचे हे दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ. वृषाली आठवले मावळंकर यनी सरस्वती वंदन सादर केले। खास निमंत्रितांचा सत्कार व स्वागत आमचे जेष्ठ सदस्य श्री. विजयदादा मुकुंद यांनी केला। श्री. सतीश गजानन यांनी या संमेलनाचे मुख संयोजक म्हणून प्रास्ताविक केले. त्यांनी या संमेलन आयोजनामागील पार्श्वभूमी विदित केली. हे संमेलन यशस्वी व्हावे म्हणून ज्या कार्यकर्त्यांचा हातभार लागला त्या सर्वांचा त्यांनी नामोेल्लेख केला। यावेळी सर्वच सभासदनी चे टाळ्यांच्या गजरात अभीनंदन केले. श्री. अशोक वझे यांनी चित्पावन संघाच्या विविध उपक्रमांची माहीती देत नवीन उभारण्यात येणाया इमारतीला भरघोस देणगी देण्या विषयी विनंती केली. बरोबर 11 वाजता आमच्यातील वैशिष्ठ्यपुर्ण कामिगरी करत असलेले  श्री. िवजय मुकुंद ( शोगनी उदयोगाचे संथापक), श्री. मिलिंद पुरुषोत्तम(आठवले फूडस चे संचालक), सौ. प्रतिभा जयंत (अहमदाबाद येथील दंत वैद्यक व समाज सेवीका), सौ. सरोज जयंत (मुंबई येथील आर्टिफिशीयाल ज्वेलरी निर्माती), सौ. स्वप्ना नचीकेत (पुणे येथील एकमेव महीला प्लास्टीक सर्जन), व सौ. क्रांती पाटणकर (वकील व समाजसेवक) यांची प्रकट मुलाखत सौ शैला मुकुंद यांनी घेतली. सर्वच सभासदाना हा कार्यक्रम अतीशय आवडला। नंतर सभासदांनी श्रीखंड पुरी सुरस भोजनाचा आनंद घेतला व त्याचवेळी एकमेकाशी परीचय करुन घेतला।भोजना नंतर सर्व सभासद परत 2.30 वाजता पुढील कार्यक्रमासाठी एकत्र जमले। आता श्री. श्रीकांत गोपाळ यांनी सूत्र संचालनाची जबाबदारी घेतली। आठवले कुळातील अतिशय पूजनीय अशा कै. प.पु. पडुरंगशास्त्री आठवले व कै. पु. अनंत दामोदर उफ स्वामी वरदानंद भारती यांचे हे जन्म शताब्धी वर्षं असल्याने त्यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना आदरांजली वाहीली। कै. आनंतरावचे चीरंजीव श्री. महेश अनंत व कै. पडुरंगशास्त्री यांच्या चुलत भगिनी सौ केळकर त्यांनी थोडक्यात या दोघांनवीषयी माहीती सांगीतली

श्री. सतीश गजानन यांनी 80 वर्षावरील जेष्ठ सभासदांचा सत्कार केला तर श्री. विनायक विष्णु यांनी 75 वर्षवरील सदस्यांचा सत्कार केला। सौ. अंजली हरीश याना याच दिवशी 60 वर्षं पूर्ण झाली म्हणून सौ.यशश्री सुयोग यांचे हस्ते त्यांचा सत्कार करुन त्याना शुभेछा दिल्या. विनायक विष्णू यांनी पुढील कुलसम्मेलन कुठे व का भरवावे, कुलवृत्ताताचे पुढील काम कसे करावे, आठवले कुळाचा  ट्रस्ट असावा का नाही व शिल्लक रकमेचा विनीयोग कसा करावा याविषयी उपस्थितांबरोबर चर्चा केली. बऱ्याच सदस्यानी खूप सूचना केल्या। त्या शंकांना श्री. िवनायक व श्री. सतीश गजानन यांनी उत्तरे दिली। श्री.  अनिल महादेव यांनी आभार मानले . सौ. सीमा दत्तात्रय यांच्या पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.