* कृष्णाजी भास्कर आठवले हे साहेबराव मोदी यांचेबरोबर मूव्हीटोन पिक्चर्समध्ये कार्यरत होते. धोक्याची कामे करीत असत, अतिशय हुशार, निडर व्यक्तीमत्त्व होते. सिनेमाच्या शुटींगसाठी चालत्या रेल्वेगाडीतून वसईच्या खाडीत उडी मारली. त्यांनी ‘पुकार’ सिनेमात धोक्याचे काम केले आहे.
---प्रभाकर कृष्णाजी (नागाव - 20)
* रामचंद्र भट हे पुण्यात धर्मशास्त्री होते. त्यांनी ग्वाल्हेरच्या महाराजांना पुण्याहून निघण्याकरिता दिशा दिली होती. त्यामुळे महाराजांनी 15 रु. चे चांदवाडी शिक्के (त्याला माफी म्हणत) दरमहा चालू केले. ते आजही चालू आहेत.
---प्रभाकर कृष्णराव (नाचणे-)
* आमचे पूर्वजांपैकी रामचंद्र यशवंत हे पुण्यात शेवटचे बाजीराव पेशवे यांचेकडे सरदार होते. 1857 च्या ब्रिटिशांविरुध्दच्या युध्दात आपल्या सर्व कुटुंबियांना रत्नागिरी येथील टेंबे गावी पाठवून स्वत: व पत्नी यांनी इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून स्वत:च्या वाड्यासह जाळून घेतले.
---रामचंद्र दत्तात्रय (टेंबे-)
* केशव नारायण यांचे सातारा येथे वास्तव्य होते. 1818 साली ब्रिटिशांविरुध्द उठावात भाग घेतलेमुळे त्यांना होळीचे दिवशी तोफेच्या तोंडी दिले.
---शारंगधर परशूराम (सोमेश्वर-)
* आमचे पूर्वज थोरले माधवराव पेशवे यांचे पदरी सरदार होते. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील शेळगाव (शेळ पिंपळगाव) हे गाव इनाम होते. आमच्या पूर्वजांनी पुणे येथील माती-गणपतीची स्थापना केली.
---मनोहर बाळकृष्ण (सोमेश्वर -5)
* हैदरअली व टिपू सुलतान यांचा त्रास मराठी राज्याला होऊ नये म्हणून पेशव्यांनी पटवर्धन यांना सरदार नेमले. तेव्हा त्यांचेबरोबर भावे व आमचे पूर्वज आठवले हे आपले भावे-आडोम गाव सोडून नरगुंद येथे गेले.
---पांडुरंग हरी (भावे-आडोम)
* महादजी शिंदे व नाना फडणीस यांच्या काळात (1782 ते 1789) विसाजी आप्पाजी आठवले या सरदारांनी उत्तर हिंदुस्तानात दिल्ली, आग्रा व अलीगड भागातील काही प्रदेश व खंडणी पेशव्यांना मिळवून दिली.
---सदाशिव नथू (नागाव)
* आमच्या मातोश्री शकुंतला भालचंद्र आठवले उत्तम चित्रकार होत्या. त्यांनी 1934 सालच्या फ्रेंच राज्यक्रांतीवर आधारीत 105 व्यक्तिरेखा (पोट्रेटस्) येथील बालगंधर्व कलादालनात त्या चित्रांचे पुन: प्रदर्शन भरविले होते.
---केशव भालचंद्र (दापोली)
* वसंत वासुदेव हे उत्तम चित्रकार होते. घोले रोड, पुणे येथील महात्मा फुले संग्रहालयात त्यांची 40 चित्रे आहेत.
---मधुकर नरहर (नागाव)
* माझी आई मंदाकिनी ही दादासाहेब फाळके यांची कन्या. ती भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून प्रसिध्द. दादासाहेब फाळके यांच्या ‘कालियामर्दन’ या मूकपटात वयाच्या 5 व्या वर्षी प्रथम काम केले.
---विवेक विश्वनाथ (गुहागर - 2)
* कै. हरी विष्णू आठवले ह्यांचे ‘आठवले बीजगणित’ ही पुस्तके 1992 पासून अंदाजे 1975 पर्यंत इयत्ता 8 वी 11 ला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके मान्यताप्राप्त होती. काही वर्षे हीच पुस्तके उत्तर प्रदेशादही शालेय शिक्षणात होती.
* कै. रामचंद्र वामन आठवले ह्यांनी गुहागर येथील नारायणाच्या मंदिराच्या आवारात सन. 1940 मध्ये भाविकांसाठी एक धर्मशाळा बांधली. (फोटो पान नं. तखखख)
* श्री. जयंत बाळाजी ह्यांनी ‘सनातन संस्था’ ही समाज सहाय्य, राष्ट्ररक्षण व धर्मजागृतीचे शिक्षण देणारी संस्था गोवा येथे स्थापन केली.
* आशिश दिलीप याने 13/12/1996 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 37 किमीचे अंतर 7 ता. 22 मि. पोहून विक्रम केला.
--- दै. सकाळ दि. 13/12/2006